India Vs Pakistan आज कोण जिंकेल ? | सामना सुरु होण्याआधीच आली धक्कादायक बातमी

India vs Pakistan Asia Cup 2023

आशिया कप स्पर्धा 2023 मधला हा तिसरा सामना आहे , या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलं आहे. नेमकं टीम इंडिया की पाकिस्तान कोण जिंकू शकतो हा हायव्होल्टेज सामना ?

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शनिवारी 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध दोन हात करायला तयार झाली आहे. आशिया कप 2023 मधला हा तिसरा सामना आहे. यावेळी पाकिस्तानकडून बाबर आझम हा पाकिस्तानचा कॅप्टनसी सांभाळणार आहे, तर शादाब खान याच्याकडे उपकर्नधारपदाची धुरा देण्यात आली आहे. आगामी येणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप आधीच होणाऱ्या या सर्वात मोठ्या रंजक सामन्यासाठी क्रिकेट विश्व तयार आहे.

ind vs pak who will win

तब्बल चार वर्षांनी भारत-पाक आमने-सामने

टीम इंडिया – पाकिस्तान वनडे क्रिकेटमध्ये तब्बल चार वर्षांनी एकमेकांसमोर खेळायला उतरत आहेत. याआधी टीम इंडिया – पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये समोरासमोर भिडले होते. तेव्हा हा सामना मॅचेस्टर मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. तेव्हा टीम इंडियाने सर्वस्व पणाला लावून पाकिस्तानला चांगलीच पराभवाची धूळ चारली होती.


हवामान अंदाज २ सप्टेंबर २०२३


वर्ल्ड कप तयारीसाठी ही अखेरची संधी

आगामी येणाऱ्या वर्ल्ड कप आधीच आशिया खंडातील सहापैकी पाच संघासाठी आशिया कप स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे वर्ड कप साठी आशिया कप स्पर्धेतून टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि सोबतच अफगाणिस्तान या पाच संघांचा जोरदार सराव होईल. त्यामुळे टीम इंडिया आशिया कपच्या माध्यमातून वर्ल्ड कपच्या दृष्टीने जोरदार तयारी करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरताना दिसेल.

आशिया कप मध्ये टीम इंडियाचाच झेंडा फडकू शकतो

आतापर्यंत टीम इंडिया – पाकिस्तान आशिया कप मध्ये एकूण तेरा वेळा एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानच्या विरोधात 13 पैकी 7 वनडे सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान पाच सामन्यात विजयी झाला आहे. मात्र एका सामन्याचा निकाल तेव्हा लागू शकला नाही. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर टीम इंडिया सरस आहे. म्हणूनच शनिवारी होणाऱ्या सामन्यामध्ये नेमकं कोण जिंकत याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे.

ह्या खेळाडू मुळे होऊ शकते भारताची अडचण

विराट कोहली ला पाकिस्तानी मीडिया आधीच घाबरलेला असतांना KL राहुल संघात परत आलेला आहे त्यामुळे भरपूर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहे, त्यामध्ये KL Rahul च्या जागी Ishan Kishan ला सामन्यात खेळवायला हवा असा भरपूर चाहत्यांची मागणी आहे
काही प्रेक्षक KL राहुल भारतीय संघात परत येणे म्हणजे भारताला धक्का आहे असे म्हणत आहे तर काही ईशान किशन ला KL Rahul पेक्षा चांगला खेळू शकतो असे म्हणणे आहे

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्नधार), फखर जमान, इमाम उल हक, इप्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान, सलमान अगहा, शाहीन अफ्रिदी, मोहम्मद नवाझ, हरीस रउफ आणि नसीम शहा

आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन(राखीव विकेटकीपर)

Leave a comment